मुख्य सामग्रीवर वगळा

दमदार शुक्रवार | वऱ्हाडी कट्टा


विदर्भ दर्शन या पेज वर आजपासून आपण वऱ्हाडी कट्टा हा सदर चालू करणार आहोत.

या सदरातील आजची पहिली पोस्ट.

-----------------------
दमदार शुक्रवार

शुक्रवारी 9.30 वाजले कि बिलकुल गल्ल्या सगळ्या सामसूम ... दमदार शुक्रवार असे दूरदर्शन वर पिच्चर राये...📺

मोजून येटायात 5-6 जणाईच्या घरी टीव्ही अन अस नाई कि रंगीत ... अंह ... ब्लॅके न व्हाईट ...फक्त काया न पांढरा च कलर ...तरी अशी नवाई कि अरे रे रे ...🖥📺💻

आता 5-6 टीव्या म्हटल्यावर सगळ्याइच्या घरात टीव्ही पाया ले जात होती अस ... जो यिऊ दिन त्याच पूर घर भरेल ...
👬👨‍👧‍👧👨‍👩‍👧

बरं झाला गोइंदा चा पिच्चर चालू 9.30 ले ...10.30 -  11 लोक दोन तीन खेप जाम्बोया दिऊ दिऊ अर्दे जास्त जागीच कलंडत होते (झोप लागत होती) ... मंग कोणी त्याइच्या कानात गुदगुल्या करीन ...कोणी काना खाली मारत होते ... बिलकुल झपू देत नव्हते अश्या अर्द्या मंदात झोपणाऱ्याले ... 😆

पुरा पिच्चर पायणारे कट्टर तसे कमीच होते ... 😱बिलकुल साडे बारा एक लोक पुरा पिच्चर पायणारे पक्के होते काई ...बिलकुल डोया नाई लागे त्याईचा ... तो पिच्चर कसाइ असू द्या न मंग ...😯

बरं शांता आजी बसे बॉ काय समजत अशीन म्हटलं बॉ या बुडीले ...? हे एवढा मोठा जाड्या काचा चा चष्मा ...बरं आयकू येत होत की नाई काय माहित त्या बुडीले ... 👵🏾

गोल्या म्हणे काय समजते व आजी तुले ? 🤔

अरे नाता ते चित्र दिसते हालताना अन आवाज येते ...तेवडच बरं वाटते रे भाऊ ...मले काई समजत नाई त्यातलं ...👵🏾👈🏻आजी चा रिप्लाय 😳

बरं समजा काल राती पिच्चर पायला पोऱ्याइंनं कि दुसऱ्या दिवशी जोरदार चरचा असे त्या पिच्चर वर ... हासू हासू पिच्चर चे सिन सांगत पोरे...

तुमी राजा काई म्हणा त्या DD National वर गँग मंदी बसून जे पिच्चर पायात मजा होती, ते या एसी वाल्या मल्टिप्लेक्स मंदी बी येत नाई ...अन घरी लावेल त्या छत्रीवर एवढे चॅनल आय गदिले गयाठा पण धड एक पिच्चर नाई पायत कोणी पुरा ... तुमिच सांगा ते मजा येते काय ?

वऱ्हाडी कट्टा (उणाया)

ओ गोल्या अरे मुंग्या आल्या न बे एन्टीना फिरो न लेका एण्टम्या ...📺😛

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विदर्भाचा प्राचीन इतिहास

विदर्भाचा प्राचीन इतिहास :- विदर्भ हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर  ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे.  'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती. गुत्समद ऋषींनी विदर्भात कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रथम केला.त्यांनी कापसाचे सुत काढून त्याचे कापड विणण्याचा शोध लावला. त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता , विणकर व कृषी संशोधक अशी होती. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोरवर झिरपला होता. याच्या खुणा उत्खनना वेळी सापडतात. सातवाहनांचे राज्य विदर्भावर दीर्घकालीन इसवी सनपूर्व २०० पासून सन २५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष चालले.सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगे पर्यंतचा प्रदेश हो...

नरनाळा वन्यजीव अभयारण्य

#VidarbhaDarshan - नरनाळा वन्यजीव अभयारण्य २ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर, सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये नरनाळा अभयारण्य वसले आहे. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरले आहे. येथील तापमान ३५ ते ४३ अंश सेल्सिअस असते. वर्षभरात येथे ५०० ते ९०० मि.मी. पाऊस पडतो. या अभयारण्यात  सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर (विशिष्ट जातीचे हरीण) हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. ह्या अभयारण्यस ऐतिहासिक, जैविक, पौराणिक व पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान असून हे पर्यटकांसाठी एक आकर्षणकेंद्र बनले आहे. अभयारण्यास जाण्याचा मार्ग - अकोटपासून नागपूर विमानतळ २७० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यापासून अकोला रेल्वे स्टेशन ६५ कि.मी. अंतरावर आहे, तर अकोट मीटर गेज रेल्वे स्टेशन २० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यास जायला अकोट व अकोल्यापासून बस व टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत. ऑक्टोबर ते मे हे दिवस अभयारण्यास भेट दे़ण्यास उत्तम आहेत.  शहानूर गाव हे या अभयारण्य...

नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्‍याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्‍याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्‍या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्‍या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्य...