मुख्य सामग्रीवर वगळा

बाहुबली | वऱ्हाडी कट्टा


#VidarbhaDarshan

वऱ्हाडी कट्टा सदरातील आजची बाहुबली वर आधारित पोस्ट-

पुरा तीन घंटे बाहुबली टक लावुन पायला.. हिरोचें केसं उडे तवां मांगची हिप्पी कीतीक हाय केसाची बोटं फिरवु फिरवु पाहो.. त्याची दाढी उळे हवेनं न मस्त भुरभुर त दाढीतुन हात फीरवुन मस्त हिरोसारखीच फिलींग इन्जॉय करो.. त्यांच्या एका एका डायलागं वर तोंड असं एकदम आवेशपुर्ण अन लयच नाक गीक अस फुगवुन राजेशाही दिसाची फिलींग मनात आनो.... टाकीजीतले बाकीचे मानसं त नीराच उली उली दिसत मायेपुढे जसे.. इतकी मायी नजर व्यापक झालती की परद्याच्यान तसे दिसत ते कायमाईत. पण इतके की मच्छर हायेत सायाचे सगळे आपलेपुढे. एक फुक मारली त उडुन जातील सगळे असा विचार करता अन पिच्चर पायता इंटरवल आला..

बाहेर जाचे वाक्ती काहीजनं मधातच पाय लंबे करुन बसेल. त्याईच्या कडे बम्म रागानं, त्वेषानं असी एक भुवई उच्ची करुन प्रभास सारख पाहो.. त्याले ते इतक्या कमी उजीडात दिसली की नाई दिसली कायमाहीत. पण त्यान पाय जमा केलते..

पीच्चर सुटल्यावर त असा हिरोसारखाच भाईर निंगालो. नाक गीक फुगवुन, छाती गीती काढुन टकाटक एकदम... भाईर निंगता बरोबर पाच रुपयाचे खरमुरे घेतले. त त्यान कागदाच्या पुंगईत चारपाचच दाने देले. त त्याचा तो कोपर अन त्याची ते गरम गवऱ्याची तवली अन त्यालेही अस उडवुन द्या वाटल.. खरमुरे खाऊन रायलतो चांगले त एक धडाधुंगळा भिकारी आला दोन रुपये मांगत त्याच्या नाकावर एक बुक्की मारा वाटली जोऱ्यानं.. गाडी काढुन घरी जातांनी जो ही मंधात आला गाडीवाला ओव्हरटँक कराले पाहुन त्याचे आंगावरच गाडी न्या वाटली.. काही लोकं पाहुन रायले त. म्हतल शंभर टक्के आपुन बाहुबलीसारखे दिसुन रायलो काहीतरी. दाडीगीडीच्यान...

घरी आलो. हातपाय धुतले. अन भांग कराले आरशाजोळ आलो. त काई नोत राजे हो.... भुरके भुरके केसं होते गयभान्यासारखे.. एखांद्या वैताग्या सारखी दाढी दिसे. डोये नीरा बारीक बारीक अन दोन्ही इकुन अर्धा अर्धा किलोचे दोन गाल.. हिरो समजलच सोताले त समजा नवाजुद्दिन सिद्धिकी.. बस याचे पुढे लुक काई गेला नाई अन अजुनच तोंड उतरल. पुरी तीन घंट्याची हवा भसकन्न गेली......

चिञपट हे समाजमनावर इफेक्ट करतात. अस आयकल होतं....!

                            पण इतका.......

                               

- वऱ्हाडी कट्टा

लेखक - शिवा भाऊ देशमुख

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विदर्भाचा प्राचीन इतिहास

विदर्भाचा प्राचीन इतिहास :- विदर्भ हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर  ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे.  'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती. गुत्समद ऋषींनी विदर्भात कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रथम केला.त्यांनी कापसाचे सुत काढून त्याचे कापड विणण्याचा शोध लावला. त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता , विणकर व कृषी संशोधक अशी होती. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोरवर झिरपला होता. याच्या खुणा उत्खनना वेळी सापडतात. सातवाहनांचे राज्य विदर्भावर दीर्घकालीन इसवी सनपूर्व २०० पासून सन २५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष चालले.सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगे पर्यंतचा प्रदेश हो...

नरनाळा वन्यजीव अभयारण्य

#VidarbhaDarshan - नरनाळा वन्यजीव अभयारण्य २ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर, सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये नरनाळा अभयारण्य वसले आहे. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरले आहे. येथील तापमान ३५ ते ४३ अंश सेल्सिअस असते. वर्षभरात येथे ५०० ते ९०० मि.मी. पाऊस पडतो. या अभयारण्यात  सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर (विशिष्ट जातीचे हरीण) हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. ह्या अभयारण्यस ऐतिहासिक, जैविक, पौराणिक व पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान असून हे पर्यटकांसाठी एक आकर्षणकेंद्र बनले आहे. अभयारण्यास जाण्याचा मार्ग - अकोटपासून नागपूर विमानतळ २७० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यापासून अकोला रेल्वे स्टेशन ६५ कि.मी. अंतरावर आहे, तर अकोट मीटर गेज रेल्वे स्टेशन २० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यास जायला अकोट व अकोल्यापासून बस व टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत. ऑक्टोबर ते मे हे दिवस अभयारण्यास भेट दे़ण्यास उत्तम आहेत.  शहानूर गाव हे या अभयारण्य...

नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्‍याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्‍याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्‍या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्‍या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्य...