मुख्य सामग्रीवर वगळा

उमरेड - कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य, नागपूर


#VidarbhaDarshan - उमरेड, कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य, नागपूर

निसर्गाप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे नवीन अभयारण्य खुले करण्यात आले आहे. ह्याच जंगलात आशिया खंडातील सर्वात मोठा "जय टायगर" होता जो अचानक एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाला आहे !

पवनी तालुक्यात पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण, पवनीचा ऐतिहासीक किल्ला, रुयाळ येथील आंरराष्ट्रीय स्थळाचे महासमाधी, महास्तूप, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी श्रीगणेश मंदीर, धरणीधर गणेश मंदीर आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे. अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

पर्यटनात वाढ गोसेबुज : उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यांतर्गत येणार्‍या पवनी वन्यजीव अभयारण्यात करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत ४४४ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. या गणनेत ४0 वनकर्मचारी व पाच अशासकीय सदस्यांचा समावेश होता.
या अभयारण्याची शान ठरलेल्या जय नामक वाघाची व वाघीनीची नोंद उमरेडजवळ करण्यात आली. तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या पर्यटन क्षेत्रामुळे या अभयारण्यातही मोठय़ा संख्येने पर्यटक भेटी देत आहेत.
पवनी वन्यजीव अभयारण्याला २0१३ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजूर मिळाल्यानंतर जागतिक वनदिनी २१ एप्रिल रोजी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. जंगलातील रस्ते, कृत्रीम पानवठे व हँडपंप तयार करण्यात आले आहे. प्रशिक्षित गाईडची नियुक्ती करण्यात आली आहे.
अभयारण्यात घनदाट जंगल असून क्षेत्र विस्तीर्ण असल्यामुळे या क्षेत्रात वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा संचार असतो. ५0 चौरस कि.मी. क्षेत्रातील जंगलात वन्यप्राणी गणना करण्यात आली. या करीता २0 पानवठय़ावर मचान उभारण्यात आले होते. या गणनेत दोन अस्वल, ४0 गव्हे, ४७ चितळ, ६२ सांभर, ४१ भेकळ, ५५ निलगाय, ८४ रानडुक्कर, एक सायाळ, तीन ससे, एक मुंगूस, ७८ माकड, एक घोरपड व २९ मोर असे एकूण ४४ वन्यप्राणी आढळून आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विदर्भाचा प्राचीन इतिहास

विदर्भाचा प्राचीन इतिहास :- विदर्भ हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर  ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे.  'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती. गुत्समद ऋषींनी विदर्भात कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रथम केला.त्यांनी कापसाचे सुत काढून त्याचे कापड विणण्याचा शोध लावला. त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता , विणकर व कृषी संशोधक अशी होती. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोरवर झिरपला होता. याच्या खुणा उत्खनना वेळी सापडतात. सातवाहनांचे राज्य विदर्भावर दीर्घकालीन इसवी सनपूर्व २०० पासून सन २५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष चालले.सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगे पर्यंतचा प्रदेश हो...

नरनाळा वन्यजीव अभयारण्य

#VidarbhaDarshan - नरनाळा वन्यजीव अभयारण्य २ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर, सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये नरनाळा अभयारण्य वसले आहे. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरले आहे. येथील तापमान ३५ ते ४३ अंश सेल्सिअस असते. वर्षभरात येथे ५०० ते ९०० मि.मी. पाऊस पडतो. या अभयारण्यात  सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर (विशिष्ट जातीचे हरीण) हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. ह्या अभयारण्यस ऐतिहासिक, जैविक, पौराणिक व पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान असून हे पर्यटकांसाठी एक आकर्षणकेंद्र बनले आहे. अभयारण्यास जाण्याचा मार्ग - अकोटपासून नागपूर विमानतळ २७० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यापासून अकोला रेल्वे स्टेशन ६५ कि.मी. अंतरावर आहे, तर अकोट मीटर गेज रेल्वे स्टेशन २० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यास जायला अकोट व अकोल्यापासून बस व टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत. ऑक्टोबर ते मे हे दिवस अभयारण्यास भेट दे़ण्यास उत्तम आहेत.  शहानूर गाव हे या अभयारण्य...

नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्‍याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्‍याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्‍या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्‍या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्य...