मुख्य सामग्रीवर वगळा

सुफी संत दादा हयात कलंदर दर्गा, मंगरूळपीर, वाशिम

 #VidarbhaDarshan - सुफी संत दादा हयात कलंदर दर्गा, मंगरूळपीर, वाशिम 




वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी एक मंगरूळ पीर. ‘मंगलपूर’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘मंगरूळ’ हे नाव तयार झाल्याचे सांगितले जाते. या शहराच्या नावाला ‘पीर’ हा शब्द लागण्याचे कारण म्हणजे येथील सुप्रसिद्ध पीराचा दर्गा. या शहरातील विविधधर्मांच्या लोकांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत.


मला येथील सर्वात  जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे दरवर्षी होणारी जत्रा. ही जत्रा दहा दिवस चालते. या जत्रेत मोठमोठाले पाळणे, विविध वस्तूंची दुकाने तसेच खाद्यपदार्थांचे गाडे असतात. टुरिंग टॉकीजेस तसेच खेळांची दुकानेदेखील असतात. सर्कशीसारख्या थरारक गोष्टी असतात. प्रत्येकाने एकदातरी ही जत्रा अनुभवावी असे मला वाटते.


हे शहर एक आध्यात्मिक भूमी आहे. या शहरातील पीराचा दर्गा हा सुफी संत दादा हयात कलंदर यांचा आहे. जगात जे तीन कलंदर होऊन गेले त्यांपैकी हे एक. विंध्य ओलांडून येणारी ही पहिली मुस्लीम व्यक्ती. खुद्द औरंगजेबाने या दर्ग्याला देणगी दिल्याची नोंद आहे.हा दर्गा म्हणजे अतिशय सुंदर व प्रेक्षणीय  स्थळ आहे. तसेच या शहरात ब्रिटिशांच्या काळात श्री बिरबलनाथ महाराज हे संतपुरूष होऊन गेले. त्यांनी येथे नाथ संप्रदायाचा प्रसार केला. येथेच त्यांनी जिवंत समाधी घेतली. शहराच्या मध्यभागी त्यांचे समाधी मंदिर आहे. त्यांच्यावरील श्रध्देपोटी शहराला ‘मंगरूळनाथ’ असेही म्हटले जाते. येथे दरवर्षी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जत्रा आयोजित केली जाते. या आध्यात्मिक स्थळांना भेट दिल्यावर आपल्याला एका वेगळ्याच उर्जेचा अनुभव येतो.


शहरामध्ये एक मोठा तलाव आहे जो पावसाळ्यामध्ये पाहणार्‍यांचे लक्ष वेधून घेतो. शहराच्या आतील भागात दाट लोकवस्ती असली तरी शहराच्या आजूबाजूंनी अनेक झाडे आहेत. शहराचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक मोकळी मैदाने आहेत. ही मोकळी मैदाने म्हणजे मुलांचे सर्वात आवडीची ठिकाणे. कारण इथेच मुलांचा शारीरिक विकास होतो. असे हे शहर नक्कीच भेट देण्यासारखे आहे.


 — मंदार कुळकर्णी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विदर्भाचा प्राचीन इतिहास

विदर्भाचा प्राचीन इतिहास :- विदर्भ हे नाव 'विदर्भ' ह्या महाभारतकालीन राजाच्या नावापासून रूढ झाले. विदर्भातील कौदिन्यपुर  ह्या रुख्मिनिच्या नगरीने त्या काळी कलेचे शिखर गाठल्याचे उल्लेख सापडतात. प्राचीन भारतातील काही स्त्रिया ह्या विदर्भाच्या आहेत. 'लोपामुद्रा ' हि विदर्भ राज्याची मुलगी, ' दयमन्ति ' हि विदर्भकन्या तर सर्वपरिचित आहे.  'इंदुमती' हि देखील कुंडी नापुराच्या भोजराजाची बहिण. विदर्भाचे ' भोज कट ' हे देखील एक नाव आहे. रुख्मिणीने ' भोज कट ' हि विदर्भाची राजधानी वसवली होती. गुत्समद ऋषींनी विदर्भात कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रथम केला.त्यांनी कापसाचे सुत काढून त्याचे कापड विणण्याचा शोध लावला. त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता , विणकर व कृषी संशोधक अशी होती. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोरवर झिरपला होता. याच्या खुणा उत्खनना वेळी सापडतात. सातवाहनांचे राज्य विदर्भावर दीर्घकालीन इसवी सनपूर्व २०० पासून सन २५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष चालले.सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगे पर्यंतचा प्रदेश हो...

नरनाळा वन्यजीव अभयारण्य

#VidarbhaDarshan - नरनाळा वन्यजीव अभयारण्य २ मे, १९९७ रोजी नरनाळा किल्ला व त्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल ‘नरनाळा वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर, सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये नरनाळा अभयारण्य वसले आहे. हे अभयारण्य अकोट तालुक्यात असून, १२.३५ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरले आहे. येथील तापमान ३५ ते ४३ अंश सेल्सिअस असते. वर्षभरात येथे ५०० ते ९०० मि.मी. पाऊस पडतो. या अभयारण्यात  सांबर, बिबट्या, तसेच बार्किंग डिअर (विशिष्ट जातीचे हरीण) हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. ह्या अभयारण्यस ऐतिहासिक, जैविक, पौराणिक व पुरातत्त्वशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थान असून हे पर्यटकांसाठी एक आकर्षणकेंद्र बनले आहे. अभयारण्यास जाण्याचा मार्ग - अकोटपासून नागपूर विमानतळ २७० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यापासून अकोला रेल्वे स्टेशन ६५ कि.मी. अंतरावर आहे, तर अकोट मीटर गेज रेल्वे स्टेशन २० कि.मी. अंतरावर आहे. नरनाळ्यास जायला अकोट व अकोल्यापासून बस व टॅक्सीदेखील उपलब्ध आहेत. ऑक्टोबर ते मे हे दिवस अभयारण्यास भेट दे़ण्यास उत्तम आहेत.  शहानूर गाव हे या अभयारण्य...

नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती

#VidarbhaDarshan - नांदगाव खंडेश्वर मंदिर, अमरावती शिव! अर्थात शंकर. लोप किंवा नाशाचे प्रतिक. आणि म्हणूनच नाविन्याला, सृजनाला प्रेरणा देणारे. शिवलिंगाची आराधना आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे अगदी पाच पंचवीस उंबर्‍याच्या गावांमध्येही शिवालय असतेच. या मंदिराची नावही भक्तांनी प्रेमाने ठेवलेली. कुठे हा सोमेश्वर, कुठे कोंडेश्वर, कुठे आदिनाथ. अशी कितीतरी नावांनी भक्त त्याची आराधना करतात. असेच एक पुरातन सुरेख मंदिर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातून आणि मध्यप्रदेशातून खूप भक्त इथे दर्शनाला येतात. गावाचे नावच शंकरावरून दिले आहे, नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण. अमरावतीपासून अवघे ३६ किमी अंतरावर ४५० उंबर्‍याच्या गावात मध्यवस्तीत शंकराचे एक मंदिर आहे. त्याला म्हणतात खंडेश्वर. खंडेश्वर गावात मध्यवस्तीत आल्यावर एक उंच टेकाड आहे. वर जाण्यासाठी पूर्वी येथे दगडी पायर्‍या होत्या. आता तिथे सिमेंटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. या २५-३० पायर्‍या वर चढून गेलं की एक काळ्या दगडांचा भव्य परकोट लागतो. या परकोटामधून आत शिरले की प्रशस्त प्रांगणाच्य...