मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आनंदेश्वर मंदिर, लासूर

आंनदेश्वर, लासुर, अमरावती     सध्या माझा मुक्काम माहेरी दर्यापूरला आहे, बऱ्याच दिवसांनी इकडे आल्यामुळे माहेरपण पुरेपूर उपभोगत आहे हे वेगळं सांगायला नकोच! नुकतीच कुटुंबासह लासुरला भेट दिली. वयाची ३६ वर्षं उलटली तरी अगदी गावाजवळ असलेल्या या मंदिरात जाण्याचा योग काही आला नाही!      दर्यापूरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर लासुर नावाचे खेडेगाव आहे, ते प्रसिद्ध आहे एका विशेष बाबी साठी, ती म्हणजे इथे असलेले आंनदेश्वर शिव मंदिर! दर्यापूर-अकोला मार्गावर असलेल्या लासुर गावात स्थित असलेल्या या मंदिरापर्यंत थेट जायला सुस्थितीतला सिमेंटचा रस्ता आहे ज्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.     विशेष आकर्षणाची गोष्ट म्हणजे हे शिवमंदिर आहे तब्बल ८०० वर्षं जुनं, १२ व्या शतकात बांधलेलं! पुरातन पण खूप सुंदर!      बऱ्यापैकी उंचावर वसलेल्या या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील रम्य आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने जरा डोकावून नजर फिरवली की सगळीकडे हिरवागार दिसतं.. झाडं.. आणि खाली पसरलेलं कुरण.. त्यात चरत असलेल्या गायी..वर पसरलेले मळभ दाटून आलेलं...
अलीकडील पोस्ट

मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली ऐतिहासिक पायविहिर, जयपूर, बुलढाणा

#VidarbhaDarshan - मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली ऐतिहासिक पायविहिर, जयपूर, बुलढाणा  बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यातील जयपूर हे छोटं ऐतिहासिक गाव. मिर्झा राजे जयसिंग विदर्भ दौर्यावर असताना काही काळ जयपूर येथे वास्तव्यास होते. त्यांनी येथे पायरी विहीर आणि छत्री बांधली. छत्री सध्या अस्तित्वात नाही. पण विहीर मात्र अजून तग धरुन जयसिंगांची साक्ष म्हणून आहे.  ही पुरातन विहीर अष्टकोणी आहे. विहीरीचा खालील भाग दगडात बांधलेला आहे. आणि वरील भाग जुन्या काळातील चपट्या विटांनी बांधलेला आहे. विहीरीच्या आत खोल्या आहेत. विहीरीत उतरण्यासाठी दोन बाजूंनी पायर्या आहेत. विहीर अजून सुस्थितीत आहे, साफसफाई आणि डागडुजी केल्यास सुंदरता वाढेल. जयपूर हे ऐतिहासिक गाव आहे. येथे मिर्झा राजे जयसिंगांच्या खाणाखुणा सापडतात. गावाच्या पुर्व दिशेला सुर्य मंदिर आहे. विहीर परिसरात तीन प्राचीन समाधी होत्या, त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. आधी जयपूर आणि कोथळी एकच गाव होते. जयपूर हे नाव जयसिंग यांच्या नावावरुनच ठेवले गेले आहे. जवळच गोसिंग गाव आहे त्या गावाचा संबंध सुध्दा जयसिंगाशी असावा. जयसिंगांचे मुळ ग...

सुफी संत दादा हयात कलंदर दर्गा, मंगरूळपीर, वाशिम

  #VidarbhaDarshan - सुफी संत दादा हयात कलंदर दर्गा, मंगरूळपीर, वाशिम  वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी एक मंगरूळ पीर. ‘मंगलपूर’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘मंगरूळ’ हे नाव तयार झाल्याचे सांगितले जाते. या शहराच्या नावाला ‘पीर’ हा शब्द लागण्याचे कारण म्हणजे येथील सुप्रसिद्ध पीराचा दर्गा. या शहरातील विविधधर्मांच्या लोकांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. मला येथील सर्वात  जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे दरवर्षी होणारी जत्रा. ही जत्रा दहा दिवस चालते. या जत्रेत मोठमोठाले पाळणे, विविध वस्तूंची दुकाने तसेच खाद्यपदार्थांचे गाडे असतात. टुरिंग टॉकीजेस तसेच खेळांची दुकानेदेखील असतात. सर्कशीसारख्या थरारक गोष्टी असतात. प्रत्येकाने एकदातरी ही जत्रा अनुभवावी असे मला वाटते. हे शहर एक आध्यात्मिक भूमी आहे. या शहरातील पीराचा दर्गा हा सुफी संत दादा हयात कलंदर यांचा आहे. जगात जे तीन कलंदर होऊन गेले त्यांपैकी हे एक. विंध्य ओलांडून येणारी ही पहिली मुस्लीम व्यक्ती. खुद्द औरंगजेबाने या दर्ग्याला देणगी दिल्याची नोंद आहे.हा दर्गा म्हणजे अतिशय सुंदर व प्रेक्षणीय  स्थळ आहे. तसेच या शहरात ब्रिटिशांच्या काळात...

कोळेश्वर मंदिर, रोहिणखेड

#VidarbhaDarshan - कोळेश्वर मंदिर, रोहिणखेड बुलढाणा जिल्ह्यांत मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे अस्तित्वात असलेले प्राचीन शिव मंदिर हे कोळेश्वर नावाने ओळखले जाते. मोताळा तालुक्यापासून १२ कि.मी. अंतरावरील रोहिणखेड हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे. कोळेश्वर मंदिर प्राचीन असून हेमाडपंथी शैली मध्ये मंदिराचे बांधकाम केलेले आहे. मंदिराच्या स्तंभावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्यात महादेवाची पिंड आहे, ही पिंड महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात येथे भक्तांची गर्दी जमते. रोहिणखेड गावात या कोळेश्वर मंदिरासह अनेक ठिकाणी पुरातन वास्तुंचा ठेवा आहे. येथे स्थापत्य कलेचा विलोभनीय उदाहरण असलेली मशीद आहे. एकेकाळी निजामशाहीत राजधानीचे शहर म्हणून रोहिणखेड गावाला रोहिणाबाद अशी ओळख होती. येथे दोन मोठय़ा लढाया झाल्याचा इतिहास आहे. सन १४३७ च्या सुमारास खान्देशचा सुलतान नजिरखानने त्याचा जावई अल्लाउद्दीन बहामनीवर स्वारी केली. सन १९५0 च्या सुमारास अहमदनगरच्या राजकुमार बुरहानने खान्देशचा राजा अलिखानच्या बरोबर जमालखानवर याच ठिकाणी युद्ध केल्या...

हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव जयपूर

#VidarbhaDarshan - हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव जयपूर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर गाव हे गाव हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. या गावात मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत, अगदी भिंतीला भिंत लागून आहेत, तरीही आजवर इथे कधी सामाजिक दंगल किंवा धार्मिक तनाव निर्माण झाला नाही. सर्व हिंदू आणि मुस्लिम मिळून मिसळून राहतात. मोताळा तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयपूर गावात हनुमान मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत. एकीकडे मशीदीत अजान - नमाज अदा केली जाते तर दूसरीकडे मंदिरात घंटांच्या नादात बजरंग बलीचा जयघोष चालू असतो. भक्तीचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी सर्वांची श्रद्धा एक आहे. मंदिर आणि मशीद जवळ एक वटा बांधलेला आहे, जिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करतात. हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या लग्न कार्यात सहभागी होतात. दसरा - दिवाळीला मुस्लिम लोक हिंदूना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात, हिंदू लोक त्यांना फराळाला घरी नेतात. याचप्रमाणे ईद साजरी केली जाते. हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना ईद मुबारक देतात, मुस्लिम बांधव ही हिंदू...

भंडारेश्वर मंदिर, गडचिरोली

#VidarbhaDarshan - भंडारेश्वर मंदिर, गडचिरोली भंडारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड गावाच्या पश्चिमेला असलेले एक प्राचीन मंदिर आहे. खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाच्या उंचवट्यांवर हे मंदिर स्थित आहे. येथे भगवान शिवाचे शिवलिंग आहे, प्रवेशद्वारात नंदी आहे. हे मंदिर दर्जेदार वास्तूचे एक उत्तम उदाहरण आहे आणि भिंती वर सुंदर आणि रेखीव कोरीव काम आहे त्यावरून हे मंदिर हेमाडपंथी काळखंडातील समजल्या जाते. महाशिवरात्रीला येथे दूरदूर हून लोक एकत्र होतात. मंदिरात नैसर्गिक प्रतिध्वनी प्रणाली आहे.

गोरजाई माता मंदिर, गडचिरोली

#VidarbhaDarshan - गोरजाई माता मंदिर, गडचिरोली गोरजाई मंदिर हे गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथे आहे. देवी गोराजियाच्या दर्शनासाठी खूप भाविक येथे येत असतात. हे मंदिर वैरागड किल्ल्याच्या दक्षिणेला आणि खोब्रागडी व वेनलोच्चा नद्यांच्या संगमाजवळील आहे. मंदिराची वास्तुशिल्पाची स्थिती विलक्षण स्थितीत आहे आणि त्याची छत अठरा खांबांवर आहे. वैरागड येथे असलेल्या दोन हेमाडपंथी मंदिरापैकी हे एक आहे, पण या मंदिराची सध्या दुरावस्था झालेली आहे.